रानकुक्कुट अज्ञाने यांचे 'खरा कुक्कूटेतिहास'  हे पुस्तक शिवराळ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. हे पुस्तक लिहिल्या लिहिल्या स्वतः लेखकानेच या पुस्तकाचे वाचन करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. जरी जोडाक्षरे येत नसल्याने तो सोडुन द्यावा लागला तरी यावरूनच लेखक अभ्यासू असल्याचे स्पःट होते. या पुस्तकास गुल्लुमिया पुरस्काराचे मानकरी कुक्कुटाचार्य वाह वाह काळोखे यांची प्रस्तावना लाभली असून गुंडोत्तम वेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे.

शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले ते केवळ कुक्कुटकल्याणासाठी, औरंगजेबाशी लढा दिला ते केवळ तो रोज वीस कोंबड्या फस्त करत असल्याने हे सत्य आता सर्वानाच माहित झाले आहे. त्याला कोणी नाकारू शकणार नाही ( जे नाकारतील त्यांचे नाव पत्ते पाठवा, पुढचे बघुन घेउ). असे असतांना त्यांना हिंदूंचे, भारतीयांचे वा मानवांचे तारणाहार संबोधुन इतिहासाचे मानवाने विकृतीकरण केले आहे, पन हा कट आता आम्ही उघडकीला आणला आहे.

सखोल संशोधन करून हे पन सिद्ध केले आहे या पुस्तकात की महाराजांनी किल्ले बांधले ते तटबंदीच्या आत सर्व कुक्कुटांना निर्भयपने फिरता यावे म्हनून. त्याला स्वराज्याचे संरक्षन वगैरे कुटील हेतू लावनाऱ्यांचा धिक्कार आहे.

गोब्राम्हनप्रतिपालक वगैरे सब झूठ आहे, कुक्कुटसंरक्षक म्हनायला पायजेल.

या लेखावर आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने बंडी घातली नाही म्हणजे यात लिहिलेले सगले वाक्य न वाक्य हे त्या पुस्तकाप्रमानेच सत्य आहे हे सिद्ध झाले आहे.

जय कुक्कुट !!!

जाज्वल्य कुक्कुटधर्माला मनोगतावर वाढता पाठिंबा मिळतो आहे, मागच्या वर्षी चौदा लाख  आनि या वर्षी  दोन कोटी मनोगतींनी कुक्कुटधर्मात प्रवेश केला. पेपरमध्ये फक्त साडेपाच लोकांनी केला असे आले ते खोटे आहे कारन सर्व पेपर आनि शिक्षित लोक आमच्या विरोधात आहेत. ( पाच फुल आनि एक हाफ )

( तुम्हालाही या खऱ्या कुक्कुटेतिहासात मोलाची भर घाला अशी विनंती. )