त्यामुळे प्रत्येकाच्या वाटण्यात फरक असू शकतो.
कुणाला काय वाटावे ह्यावर कुणाचेही नियंत्रण नाही
तसेच 'भेसळ' कुठली आणि 'फोडणी' कुठली हे कोण ठरवणार आणि कसे ठरवणार?
याचा अर्थ चूक-बरोबर असे काही नसतेच, ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावे असा निघत असेल तर संपलेच म्हणायचे. मग 'इन द मॉर्निंग मॉर्निंग आय रिमूव्हड अ झेरॉक्स ऑफ माय सर्टी यार..' हेसुद्धा आपण 'ज्याचे त्याचे' असे म्हणून बरोबर आहे, असे म्हणणार काय?
भाषेच्या पावित्र्याबद्दल जागरूक असणारे किती असतात. म्हणजे टक्केवारी? केवळ ह्या लोकांमुळचे भाषा तगते आणि समृद्ध होते काय? हे सगळे लोक आवर्जून, हमखास नाटकं बघतात काय?
दुसरे म्हणजे, भरत दाभोळकरांची नाटके मुंबई सोडून कुठे चालतात? मुंबई आणि पुणे सोडून महाराष्ट्रात माणसं राहत नाहीत काय? पुणे म्हणजे प्रमाण आहे काय? तसेच प्रमाण भाषा म्हणजे खरी मराठी भाषा काय?
इथे मुद्द्यांची गल्लत होते आहे असे मला वाटते. भाषेचे पावित्र्य असे संख्याबळावर मोजू नये. लोकप्रियता आणि गुणवत्ता यांचे प्रमाण बहुदा व्यस्तच असते. दुसरे म्हणजे मुंबई - पुणे आणि दाभोळकरांची नाटके हे एक उदाहरण आहे. यात पुणेरी मराठीचा कैवार घेतलेला नाही. 'कल्चरल फ्यूजन' या नावाखाली 'कल्चरल कन्फ्यूजन' मांडणाऱ्या दाभोळकरांना भाषाशुचितेबाबत (त्यातल्या त्यात) जागरूक असणाऱ्या पुणेकरांनी नाकारले आहे हा माझा मुद्दा. एरवी मीही पुणेरी मराठी आणि एकंदरीतच पुणेरी असण्याविषयी हळवा वगैरे नाही.
इतकी टक्के मराठी अधिक इतकी टक्के उर्दू अशी गणिती समीकरणे कुणी मांडली आहेत? थोडी हिंदी म्हणजे १० टक्के हिंदी की ०.३ टक्के? किती टक्के तुम्हाला सांगता येईल काय?
चित्तरंजन, इतके डिफेन्सिव्ह होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही असे केले आहे असे मी म्हटलेले नाही. असे करता येणार नाही, असे करू नये, इतकेच मला म्हणायचे आहे.
मला व्हिस्की आवडते, मला मसूराची आमटीपण आवडते. पण आमटीत व्हिस्की ओतून दिली तर मला ती आवडेल का? माझे म्हणणे एवढेच आहे.
अवांतर : मला प्रीती झिंटा आवडते आणि अर्नाळकर (आता) अजिबात आवडत नाहीत, हे आवर्जून लिहावेसे वाटते!