याचा अर्थ चूक-बरोबर असे काही नसतेच, ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावे असा निघत असेल तर संपलेच म्हणायचे. 
तुमची 'भेसळ' मला 'फोडणी' वाटू शकते. माझी 'फोडणी' तुम्हाला 'भेसळ' वाटू शकते एवढेच.

चित्तरंजन, इतके डिफेन्सिव्ह होण्याची आवश्यकता नाही.
:) माझ्या मते यू हॅव कॉट राँग एंड ऑफ़ द हँडल. माझ्या मते टक्केवारीने भाषा विशुद्ध की भेसळयुक्त ठरवणे चुकीचे आहे.  तसे केवळ प्रमाणभाषेबाबत करता येईल जी पाठ्यपुस्तकांत असते. वैदर्भीय साहित्यिकाच्या मराठीत  तिथला रंग आला नाही, खानदेशाच्या साहित्यिकाच्या मराठीत तिथला रंग आला नाही तर मराठी बेरंग होईल.

अवांतर पहिला मुद्दा: एखादी भाषा कशी बोलली/लिहिली जावी/जाते ह्यावर अभिजनांचे तसे नियंत्रण नाही. दैनंदिन जीवनात आणि व्यवहारात (आर्थिक, राजकीय वगैरे वगैरे) जे शब्द, शब्दप्रयोग सोयीचे, सुयोग्य, 'रेलवंट' आणि 'करंट' असतात/राहतात ते टिकतात. मराठीत हिंदी घुसखोरी करते आहे. इंग्रजी आक्रमण करते आहे.

अवांतर दुसरा मुद्दा: योग्य भाषा कुठली हे भाषातज्ज्ञांनी ठरवेपर्यंत भाषा पुढे गेली असते. पण तो कधीच आमच्या बोलीचा, भाषेचा हिस्सा झालेला असतो. एखादा शब्द शब्दकोशात यायला वर्षे जातात.

सपशेल अवांतर: प्रीती झिंटा मला आवडते. तिची आडनाव खळे असायला हवे होते.