वैशालीजी अतिशय साध्या ,सोप्या भाषेत लिहिलेल्या आपल्या लेखात नेहमीच एक दर्जेदारपणा आढळतो. आपल्या स्वभावातील माणूसकी आणि आपुलकी तसेच अडलेल्या-नडलेल्या माणसांबद्दलची सहानुभूती देखिल लेखनात प्रतिबिंबित होत असते. आपले अनुभव अतिशय हृद्य असे असतात आणि आपण ते अतिशय प्रभावीपणे आमच्या पर्यंत पोहोचवत असता.
हा लेखही आवडला. अशाच लिहित्या रहा आणि इतर मनोगतींची री ओढून मी देखिल असेच म्हणेन हे सगळे पुस्तक रुपाने आल्यास जास्त छान होईल.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!