एक गोष्ट सांगाविशी वाटते. मोठी मजेदार आहे.

सिंह आणि माणूस

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सिंह आणि माणूस यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून भांडण चालू होते. चर्चेने प्रश्न काही सुटेना. तेव्हा दोघेही लढाईसाठी उतरले.

लढाई बरेच दिवस चालू राहिली. कधी सिंहाचे पारडे जड तर कधी माणसाचे. मात्र दोघेही तुल्यबळ असल्याने निकाल काही लागेना.

पण हळू हळू माणूस थकू लागला. लढाई चालू ठेवणे त्याला अवघड वाटू लागले. काय करावे हे कळेना. अचानक त्याला एक युक्ती सुचली.

दुसर्‍या दिवशी लढाईचा भोंगा झाल्यावर मैदानात उतरण्यापूर्वी माणूस सिंहाच्या तंबूमध्ये गेला. सिंहाला एक चित्र दाखवून तो म्हणाला, "ही लढाई व्यर्थ आहे. आपल्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण याचा निर्णय आधीच झाला आहे. हा बघ पुरावा."

त्या चित्रामध्ये सिंह खाली पडलेला असून माणूस हातात तलवार घेऊन विजयी मुद्रेने त्याच्या अंगावर बसला आहे असे रेखाटले होते.

सिंहाने ते चित्र हिसकावून घेतले आणि दूरवर फेकून दिले आणि तो माणसाला म्हणाला, "हे चित्र माणसाने काढले आहे म्हणून त्यात सिंह खाली आहे, जर सिंहाने काढले असते तर माणूस खाली आणि सिंह विजयी दाखवला असता."

गोष्ट संपली.
 
दुर्दैव असे की ह्या मातीतल्या सिंहांना ही खरी गोष्ट फार उशीरा समजली. माणसांनी लिहिलेला इतिहासच ते वेडे खरा मानत होते.
 
अज्जुका यांच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर या गोष्टीत आहे असे मी समजतो.
 
२. कुठल्याही तथकथित उच्चवर्णियाला स्वतःच्या परंपरांबद्दल आणि पूर्वजांबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर असणे चुकीचे आहे.
 
त्या परंपरा जर अन्यायकारक समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतील तर त्याविषयी आदर मानणे योग्य आहे का हे त्यांनीच ठरवणे योग्य आहे.
आजही हिटलरचे वंशज त्याच्याबद्दल आदर बाळगतात. नथुराम गोडसे यांनी जे केले ते योग्यच होते असे समजणारे कमी नाहीत.
 
३. सर्व तथाकथित उच्चवर्णिय हे श्रीमंतीत लोळणारेच असतात आणि जर काही जण दरिद्री दिसत असतील तर ते केवळ सोंग असते. (म्हणजे दिवसातून एकच वेळ भाकरी आणि लाल तिखट खाऊन डॉक्टरेट मिळवणाऱ्या माझ्या आजोबांची संपत्ती कुठेतरी असणारच पुरून ठेवलेली. एवढी संपत्ती असूनही स्वतःचं हक्काचं घर त्यांना घेता आलं नाही हे पण ढोंगच नाही का?)
 
हे वाक्य केवळ अभिनिवेशपूर्ण आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.