तुमची माणूस आणि सिंहाची गोष्ट परत माझाच मुद्दा पुढे नेते आहे. जिथे जिथे 'एका' समाजाबद्दलचे चांगले उल्लेख असतील तिथे तिथे ते ते खोडले पाहिजेत आणि असं करणारा हाच फक्त जातियवादी नसेल. थोडक्यात काय 'एका' समाजाला वाईट म्हणत रहाणे इथेच तुमची जातियवाद मिटवून टाकण्याची व्याख्या संपताना दिसतेय. याला केवळ सूडाचे गणित म्हणता येईल.

आपला इतिहास (तुमचा व माझाही) हा केवळ एकाच समाजाने लिहिला आहे. त्यामुळे त्यात साहजिकच त्या समाजाचे इतरांविषयी असलेले पूर्वग्रह येणारच. येथे मी त्या समाजावर टीका करत नसून अशा लिखाणातील मानवी सहजप्रवृत्ती अपेक्षित आहे. त्यामुळे या इतिहासाबद्दल प्रश्न उपस्थित होणारच. 

>>त्या परंपरा जर अन्यायकारक समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतील तर त्याविषयी आदर मानणे योग्य आहे का हे त्यांनीच ठरवणे योग्य आहे.<<

यामधे दोनतीन मुद्दे आहेत अर्थात मी तुमच्याविरोधी सूर लावलेला असल्याने तुम्हाला मुद्दे दिसणार नाहीत ती गोष्ट निराळी.
१. गृहितक हे की 'त्या' समाजाकडे एकही चांगली परंपरा नाही आणि त्या समाजाचा एकही पूर्वज आदर करण्याच्या लायकीचा नाही.

असे मी कुठेही म्हटलेले नाही. मी पुन्हा एकदा माझी प्रतिक्रिया वाचली तेव्हा मला ते कुठे सूचित होत आहे असेही वाटले नाही. जर परंपरा अन्यायकारक समाजव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतील तर सुधारणावादी, पुरोगामी इ. इ. इ. समाजाने त्या पाळणे योग्य आहे का?


२. माणूस कितीही कसाही असला तरी अनेकदा त्याच्या स्वतःच्या मुलाबाळांकडे त्याच्या चांगल्या आठवणी असू शकतात आणि त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टीही (भौतिक नाहीत.. वळण स्वरूपातल्या). ह्याबद्दल 'त्या' समाजातील कुणीही कृतज्ञ असू नये काय?

चांगल्या गोष्टी आणि आठवणी या अभिमानास्पदच आहेत. मात्र कोणाला चांगल्या वाटणाऱ्या आठवणी या दुसऱ्यासाठी अतिशय दु:खदायक आहेत काय हेही तपासणे आवश्यक आहे.