आता रामायणाबद्दल , अहो तुमचा आणि माझा प्रश्नच नाही. आपण राम आणि रावणाला माणूस म्हणून मोजू शकतो. माझा प्रश्न आहे तो आमच्या हजारो धर्मभोळ्या , खेड्यातल्या बहुजन समाजासाठीचा ज्यांना धर्मपालन म्हणजे पुरोहित वर्ग सांगेल ते, असा प्रकार आहे. त्या मोठ्या वर्गापर्यंत हा पुरोहित वर्ग एक चुकीचा संदेश पोहोचवतो आहे असं नाही वाटत? माझ्या मते रामायणातील असे अनावश्यक जातीवाचक उल्लेख आमच्या धर्मपीठाने काढून टाकायला हवेत. त्यांनी केलं तरच ते आधिकारीक होईल याची मला जाण आहे. आणि हो माझ्या धर्मपीठाने आता तरी समाजाभिमुख व्हावं अशी माझी इच्छा. तुमच्या मठात राहून केवळ पूजापाठात मग्न राहण्याचा काळ गेला आता. चहूबाजूंनी धर्माच्या वर्मावर आघात होत असताना यांना स्वस्थ बसवतं तरी कसं?

सहमत! त्रिवार सहमत!!