१. शामची आई ३.बनगरवाडी ४.ययाति ६. चिमणरावांचे चऱ्हाट
११. संपूर्ण केशवसुत १२.विशाखा १८.आहे मनोहर तरी... १९. व्यक्ती आणि वल्ली
वरील आठ पुस्तके मी वाचलेली आहेत. विकत घेतलेली आहेत.
या यादीविषयी तुम्हाला काय वाटते? >> यादी फारच उथळ आहे.
मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का? >> नाही. 'शांतारामा', 'कऱ्हेचे पाणी', 'जीवनसेतू' इत्यादी असंख्य आत्मचरीत्रांनी समृद्ध मराठी साहित्यास अजिबातच स्थान दिलेले नाही. 'ज्ञानेश्वरी', 'गीताई' ह्यांसारख्या अत्युच्च खपाच्या धार्मिक पुस्तकांचा समावेश नाही. नाथ-माधवांच्या कादंबऱ्या, बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या, कुमुदिनी रांगणेकरांच्या अनुवादित कथा, शशी भागवतांच्या हेरा-अय्यारांच्या कादंबऱ्या ह्यांचा वासही नाही (किमान सुहास शिरवळकर तरी!). 'अपूर्वाई', 'दक्षिणरंग', 'सागरकन्या' इत्यादी जगप्रसिद्ध प्रवासवर्णनांना स्थान नाही. सावरकरांची हिंदुत्वावरील पुस्तके नाहीत, चिपळूणकरांचे निबंध नाहीत, काळकर्त्या शिवराम महादेवांची पुस्तके नाहीत. बाबासाहेब पुरंदऱ्यांचे 'राजा शिवछत्रपती' नाही. देशभक्तीस स्थानच नाही. इतरही अनेक क्षेत्रातली पुस्तके हरवलेली दिसतात.
असली यादी मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व करते म्हणणे व्यर्थ आहे.
पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल? >> मी वाचलेल्या पुस्तकांची यादी वर दिलेली आहे. उर्वरित पुस्तके मी विकत घेण्याची शक्यता नाही.