युगप्रवर्तक, मूलभूत स्वरूपाच्या लिखाणाच्या अलिकडील काळातील क्षीण होत होत जवळजवळ संपलेल्या प्रवाहाच्या अनुषंगाने आलेले अजून काही विचार :

साहित्याच्या, एकूण वाचन-संस्कृतिच्या या ऱ्हासाकडे काही निराळ्या द्दृष्टिकोनातून पाहता येईल का? साहित्य संपले कारण त्याची खरी गरजच संपली असे घडले असण्याची शक्यता आहे का? जीवन इतके बहुआयामी झाले की प्रकाशित साहित्याची त्याला कवेत घेण्याची क्षमता अपुरी पडू लागली?

तसे झालेले असल्यास ज्या गोष्टींनी या साहित्य-व्यवहाराची जागा घेतली त्यांच्या मर्यादेचे काय?

मुळात, वाचन-लिखाण संस्कृतिला काही पर्याय असू शकतो का?