उपक्रम चांगला होता. वाचकांना आवाहनही केले होते अंतर्नादने. पण जेमतेम १८२ वाचकांनी प्रतिसाद दिला, आणि ही निवड पूर्णतः त्यावर आधारित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आता या १८२ वाचकांचेही वाचन कितपत होते, त्यांना साहित्याची किती जाण होती कुणास ठाउक. शिवाय सुशि, धारप वगैरे 'लोकप्रिय' मंडळींनी बाजी मारुन आपली यादी डागाळू नये म्हणून रहस्यकथा, गुढकथा यांना सरळ सरळ बाजूलाच काढण्याची युक्ती संपादकांनी केली आहे.

मी यातली मृदगंध सोडुन इतर १९ पुस्तके वाचली आहेत, पण ती सर्वश्रेष्ठ आहेत असे मला तरी वाटले नाही.