अतुल पेठे आणि त्यांचे सहकारी गजानन परांजपे यांनी कोलटकरांच्या कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम सादर केला त्याचे रेकॉर्डींग मी काही महिन्यांपूर्वी पाहिले. पेठे यांच्या इतर स्पृहणीय उपक्रमांसारखाच हा सुद्धा एक अतिशय गुणी कार्यक्रम होता. जेजुरी, काळा घोडा , भिजकी वही अशा जवळजवळ सर्वच संग्रहातील कवितांचे अभिवाचन त्यात होते. अतुल पेठे आणि परांजपे दोघांचेही वाचन अर्थसंपृक्त होते.