जयश्री,
ही कविता काहीशी शब्दाळ,बाळबोध असली तरी तुझ्या शैलीतला लोभस मनस्वीपणा मनाला स्पर्शून जातो!
मला एक सूचना करावीशी वाटते.
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?-->या ओळीत परिमाण ऐवजी 'परीक्षा' म्हटले तर? कारण परीक्षेने(टेस्ट) 'गुणधर्म' (मित्र कोण) कळतात व 'परिमाणा'ने (मेझरमेंट,काउंट)' संख्या (मित्र किती) कळते.
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
कळण्यासाठी काही परीक्षा आहे का?--- हे कसे वाटते?
तुझा विचार कळव.
जयन्ता५२