परदेशीजी,
तुमचा 'अनुभव' वाचुन मन विषन्न झाले. खरेतर आपण एक मोठे लोकशाही राष्ट्र आहोत तरिही 'माहिती तंत्रज्ञाना' सारख्या आधुनिक क्षेत्रात सुद्धा वेठबिगारी आहे हे सत्य मान्यच करावे लागेल.
तरिही काही बाबींचा उहापोह मदत करतो का ? ते पाहुयात.
१) कुठलीही 'संस्था' तुमच्या इच्छेखातर काम करवुन घेवु शकत नाही. हा जगभरात मान्य असलेला 'कामगार कायदा' आहे. तुमच्या लिखानाप्रमाणे तुम्हाला प्रशिक्षण दिलेले काम आणि ज्यावर तुम्हाला सही करावयास सांगत आहेत ते काम यात तफावत आहे. या गोष्टी जर सिद्ध करता येत असतील तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहु शकता. पण याला फार मोठ्या हिंमतीची गरज पडेल. प्रसंगी संस्थेबरोबर तुमचे संबंध अजुन विकोपाला जातील. यात प्रसंगी न्यायालयातसुद्धा जावे लागेल. सामान्य माणुस म्हणुनच कधी या फंदात पडत नाही ( कोर्ट आणि दवाखाना मागे लागले म्हणजे सगळे संपले ते उगीचच नाही म्हणत. याचाच फायदा वेठबिगार घेतात.)
२) आता थोडे त्या संस्थेच्या दृष्टीने पाहु. कुठलीही संस्था 'नफा' कमावण्यासाठीच काम करते. ते त्यांचे प्रथम उद्दीष्ट असते. बाकीच्या गोष्टी (सामाजिक बांधिलकी वगैरे) नंतर येतात. जर तुमच्या बरोबरचा करार हा तुम्हाला आणि संस्थेला आत्ता पर्यंत फायद्याचा असेल तर ती संस्थासुद्धा तुम्हाला सोडायला एवढे आढेवेढे घेणार नाही. पण तुम्हाला सोडल्यामुळे जर तिथे असलेल्या कामगारांसाठी चुकीचा संदेश जाणार असेल तर ती संस्था सावध पावित्रा घेइल. हे सर्व प्रकरण जर थोडे सुवर्णमध्य काढुन हाताळता येत असेल तर पहावे.
३) तिसरा मुद्दा म्हणजे जे काम तुम्ही करत आहात ते ठराविक वेळेत झालेच पाहिजे असे दडपण ती संस्था तुमच्यावर आणु शकत नाही. त्यामुळे आपण तिथे एखाद्या तटस्थासारखे काम करावे. जर दडपण आणले तर वेगवेगळी कारणे आहेतच. थोड्या दिवसांत त्यांनासुद्धा तुमच्याकडुन काम करवुन घेणे अवघड होइल आणि आपला संस्था सोडण्याचा मार्ग मोकळा होइल. हे काम थोडे कटकटीचे मात्र आहे. यात 'करियर' वरचा 'फोकस' मात्र नाहिसा होतो आणि कामचुकारपणा वाढिस लागतो. कोणी म्हणेल हि स्विकारलेल्या व्यवसायाशी केलेली प्रतारणा आहे. पण कधीकधी युक्तीसुद्धा कामी येते.
जे मांडावेसे वाटले ते मांडले.
जेवढे पटते तेवढे घ्यावे, नाही ते द्या सोडुन.