आम्ही आमचे तंटे बख़ेडे न्यायालयाची पायरी न चढता सोडवू
मूळ बातमीत सामंजस्याने (अमिकेब्ली) सोडवू असेही म्हटले आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. तरी तंटे सोडवण्यासाठी कोणीतरी न्यायदाता होणे गरजेचे आहे. गैरवर्तन करणाऱ्याचे वागणे खरेच गैर आहे का, त्याला किती शिक्षा द्यावी हे कोणी ना कोणीतरी ठरवायला लागेल. म्हणजे समांतर न्यायलये तयार करावी लागतील. जोवर या व्यवस्थेतून कोणावर अन्याय होत नाही तोवर उत्तम. पण एखाद्याला जरी ही व्यवस्था चुकीची, अपुरी वाटली तर तो सरकारी न्यायलयात जाईल; व साखळी क्रियेने व्यवस्था नाहीशी होईल असे वाटते.