भावनिक आवाहनांनी/मुद्दयांनी राज्यकर्ते किंवा इतर कोणीही आपली वागणूक किंवा दृष्टीकोन बदलणार नाही.  आर्थिकदृष्ट्या दुबळ्या लोकांचा आवाज ऐकण्यात कोणालाही रस नसतो. जर आर्थिकदृष्ट्या मराठी माणसे पुढे आली तरच त्यांच्या आवाजाला किंमत येईल. त्यामुळे निरर्थक प्रचारतंत्राला बळी न पडता कोणत्याही वैध मार्गाचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे.