पण स्वतःचे दोष सुधारायला मराठी माणसाचा नकार असेल तर मग या ओरडीला काहीच अर्थ नाही असे मला वाटते. मलाही मनापासून चीड येते मुंबई अमराठी असल्याची पण कारणे शोधू बघता मला जे दिसतं त्यात हे लख्खपणे जाणवतं की फायदा कोणाचा होतोय त्यांचा.. असा फायदा होत असताना त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करून त्यांना नम्रपणे वा बळजोरीने इथून हाकून लावणे शक्य आहे का? नाही. (योग्य की अयोग्य हा पुढचा मुद्दा)
म्हणजे आपणच एवढ मोठं झालं पाहिजे (पैसा, सत्ता दोन्ही बाजूत) की आपला वरचष्मा राहील. पण आपणच मोठ होणं यासाठी पहिली गोष्ट काय करावी लागेल तर स्वतःचे दोष ओळखणं आणि ते दूर करणं.
उद्दीष्ट एकच असलं तरी मार्ग वेगळा आहे आणि मला हा मार्ग जास्त योग्य वाटतोय. याला तुम्हाला मराठीविरोधी म्हणायचं असेल तर मी एकदा खांदे उडवून आणि भिवया उंचावून गप्प बसते.. म्हणा बापडे..