मराठीच्या बाजुने नाही
विकिसाहेब, खरंतर तुमचा प्रस्ताव वाचून (चित्तसाहेबांसारखेच) हसू आले होते. आता शेवटी तुम्ही असे भावनिक आवाहन केल्याने प्रतिसाद लिहूनच टाकावा म्हटले.
मराठीची बाजू घेणे म्हणजे तुम्हाला काय करणे अपेक्षित आहे? घटकाभर गृहित धरू की मराठी भाषा, मराठी माणूस मुंबईत मागे पडतो आहे. स्पर्धेत आपण मागे पडतो म्हणजे आपले कुठेतरी चुकते आहे असे नाही का वाटत तुम्हाला? मग चुका दाखवू नका असे म्हटल्यावर चर्चाच खुंटते की नाही?
बरे, मला तरी मराठी माणूस मागे पडतो आहे असे वाटत नाही. अहो, मी बंगलोरात राहतो. इथे कानडी लोक असेच २७/२८% आहेत. जिकडे तिकडे तमिळ, मल्याळम ऐकू येते. त्यासाठी कन्नडिगा लोक मोर्चे वगैरे काढतात. पण तरी बंगलोरातली (माझ्यासारख्या) परप्रांतियांची संख्या वाढतेच आहे. कारण महाराष्ट्रात मला हवे तसे काम मिळत नाही. शिवाय हवामानही इथले (मुंबईच्या मानाने) बरे आहे.
बंगलोर ख्यातकीर्त शहर झाले आहे ते काही केवळ कानडी माणसांमुळे नाही. तसेच मुंबईची समृद्धी काही एकट्या मराठी समाजाचे कर्तृत्व नाही. हा भैय्या, तो कानडी असे भागाकाराचे विचार करण्यापेक्षा आपण भारतीय असा बेरजेचा विचार करून पहा. बरेच प्रश्न सुटतील.