सूर्याचे न चालता चालणे पाश्चिमात्य संशोधकांनी जितक्या स्पष्टपणे समजावून सांगितले तशा प्रकाराने आपल्याकडे सांगितले गेले होते असे दिसत नाही.

आपण आपल्या शास्त्रज्ञांना विसरलो हा त्यांचा दोष नाही. गेल्या वर्षीच इथे सॅन फ़्रांसिस्कोमध्ये एका cryptography वरील संमेलनात आर्यभटाच्या आर्यभटीय ह्या ग्रंथाची प्रेरणा घेऊन सर्व संमेलनाची theme तयार केली होती. संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळेला चार वाक्यांत आर्यभटाने काय काय सिद्धांत मांडले होते ह्याचे विवेचन केले. मी थक्क झालो, आणि विचार केला की अनेक क्षेत्रात आपण आपल्या इतिहासातल्या वाईटाबरोबर चांगल्या गोष्टीही विसरलोय. हा नक्कीच आर्यभटाचा दोष नाही, आपलाच आहे.