आर्यभटांनी नक्की काय सांगितले? कोणते सिद्धांत कशाच्या आधारावर मांडले? त्यावरील कोणत्या आक्षेपांचे कसे निरसन केले? वगैरे तपशील पुरवला असतात तर बरे झाले असते. आजसुद्धा आर्यभट, भास्कराचार्य आदींचा गुणगौरव जितके लोक करतात त्यामधील किती त्यांच्या सिद्धांतांचा सविस्तर अभ्यास करू शकतात? माझ्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे. पण सूर्याचे दोन्ही प्रकारचे चालणे त्यांनी किती स्पष्टपणे समजावून सांगितले होते हे समजले नाही. त्यासाठी सुलभ साधने उपलब्ध नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. यात त्यांचा किंवा आपला दोष काढायचा प्रश्न नाही.