आपण दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. हजार वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या संस्कृत ग्रंथाबद्दल मला कांही म्हणायचे नाही. तो तज्ञ मंडळींचा प्रांत आहे. ज्या वंशपरंपरा किंवा गुरुशिष्यपरंपरेच्या साखळीमधून पंचांग, ज्योतिष वगैरे गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या, त्यांत आपल्या शास्त्रज्ञांच्या शोधांचा समावेश झालेला दिसत नाही. मंगळ, शनि वगैरे ग्रह या निर्जीव वस्तू  ठरावीक मार्गाने निमूटपणे सूर्याला प्रदक्षिणा घालतात असे सर्वसामान्य लोक समजत नाहीत. त्यांना राग लोभ या भावना आहेत व ते आपल्या जीवनावर परिणाम करू शकतात असेच बहुतेक लोक मानतात.