सावरकरांनी साहित्यसंमेलनाच्याच व्यासपीठावरुन सांगितले होते"लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. पुढ्ल्या काही वर्षांत सुनिते रचली गेली नाहीत तरी चालतील,कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या नाहीत तरी चालेल.पण अद्ययावत शस्त्रांनी सज्जा अशी सेना सीमेवर सज्जा असायलाच हवी"
सावरकर त्यांच्याच एका कवितेत म्हणतात.....
रामचंद्र चापपाणि,चक्रपाणि श्रीहरी---आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देवही करी । शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये---इष्टता अनिष्टताही त्यास हेतुनेच ये
नाहीतर एकीकडे पाकिस्तानशी प्रेमालाप करायचा .मैत्रिचा हात पुढे करायचा आणि त्यानी मात्र आपल्या हातावरच बॉम्ब उडवायचा मग आपण काय करायच दुसरा हात आणि अवघा दएह अजुन शिल्लक आहे म्हाणायच?