१९८६ मध्ये मटाने १५० पुस्तकांची जंत्री प्रसिद्ध केली होती त्यात वाचक पत्रव्यवहारा नंतर २७ ची भर टाकली गेली.पण या जंत्रीचे निकष वेगळे होते. बहुधा वाङ्मयीन मूल्य,समीक्षकांचा दृष्टिकोन,तत्कालीन समाजजीवनावर परिणाम आणि लोकप्रियता इत्यादी निकष असावेत.त्या निकषांचा पूर्ण पूर्ण संदर्भ दिला नसलातरी , ती यादी सोबतच , मुंबई आकाशवाणीची यादी,साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्राप्त पुस्तकांची यादी,अंतर्नाद दिवाळी २००६ मध्येच दिली आहे. तसेच अंतर्नाद दिवाळी २००५ मध्येच १०० पुस्तकांची स्वतःची यादी अंतर्नादने दिली होती होती.या १०० मधील आधी ५० नंतर ३० लोकमताच्या आधारावर गाळून त्यांनी त्यांनी अंतिम २०ची निवड केली. अंतर्नाद चा वाचकवर्ग वाङ्मयीन दृष्ट्या अधिक जागरूक आहे हे गृहीत धरले तरी तरी तोही मर्यादित ठरतो.त्याशिवाय मनोगताच्या वाचक वर्गाची अभिरुची वेगळी असू शकतेच त्यामुळे या सर्व याद्या पुन्हा मनोगतावर मांडून स्वतंत्र निकषांवर वेगळी मनोगती यादी बनवण्यास खरे तर हरकत नसावी.
जुन्या पुस्तकांची अनुपलब्धता आणि नवीन पिढीच्या बदलत्या रुची मुळे अशा पुस्तकांचा आजच्या लोकप्रिय पुस्तकात समावेश होईलच असे नाही तेवढ्या वरून अशा पुस्तकांचे वाङ्मयीन मूल्य आणि समाजजीवनावरचा दूरगामी परिणाम मोजला जाईलच असे नाही या बाबतीत तज्ज्ञाच्या मतांवर अवलंबून राहण्याशिवाय खरेतर तरणोपाय नसतो.
या चर्चेस सुरवात करून अंतर्नादच्या दिवाळी अंकाकडे लक्ष वेधल्या बद्दल सन्जोपरावांचे धन्यवाद.या चर्चेतून मी चालू केलेल्या चर्चेस काही बळ प्राप्त होईल अशी आशा करतो.
'मराठी साहित्यातील मैलाचे दगड' (http://www.manogat.com/node/8069)
- विकिकर