तेहत्तीस कोटी देवांबद्दल काही टिप्पणी पुराणकथांतून वाचल्याप्रमाणे...

महाप्रलयानंतर वैवस्वत मनूपासून जे नऊ पुत्र झाले त्यामुळे मानव वंश वृद्धींगत झाला. यापैकी इक्ष्वाकु यापुत्रापासून पुढे रघुकुलाचा जन्म झाला. इतर पुत्रांपासूनही अनेक राजवंश निर्माण झाले.

ब्रह्मदेवाला सहा पुत्र होते. त्यापैकी एक मुलगा कश्यप याला दक्ष राजाच्या तेरा मुली दिल्या होत्या. त्यातील पहिली मुलगी अदिती, तिच्यापासून बारा मुले झाली. त्यांना आदित्य असे म्हणत. यांतील सर्वात धाकटा मुलगा म्हणजे विष्णू आणि या बाराजणांपासून जो वंश पुढे आला तो देव वंश. कदाचित त्यांची संख्या ३३ कोटी असू शकते.

देव वंश पृथ्वीवरच राहत होता असे वाटत नाही. कारण महाप्रलयानंतर तो अस्तित्वात होता. मानव वंशाचे व देव वंशाचे सख्य होते.