हौस, आठवण आणि रुखवत - या तीन गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत पण एकमेकांवर अवलंबून नाहीत.
या सगळ्या वस्तू करून लग्नात न मांडता त्या मुलीला दिल्या तरी तिला तितकीच आठवण येईल. (माझ्या मते काही दिलं नाही तरी तिला तेवढीच आठवण येईल)
पण कोणी आजी, ताई काही प्रेमाने करून देत असेल तर त्यांना दुखावणं हे अगदीच चूक आहे हे ही मी मान्य करीन.
एकूण या सगळ्या भावनिक प्रकरणामधे "रुखवत मांडणं आणि सासरच्या लोकांकडून त्याचं कौतुक होणं " याला अवाजवी महत्त्व दिलं जातं असं मला वाटतं.