प्रबोधनाच्या अंगाने जाणारे, सामाजिक सुधारणेकरता केलेला हा आक्रोश नव्हेच.

समाजसुधारणा/समाजसुधारक वगैरे अर्थ असलेल्या शब्दांबद्दल मला तिरस्कारच वाटतो अशा अर्थाची वाक्ये जीएंच्या अनेक पत्रांत वाचायला मिळतील.

दत्तूच्या व्यक्तिरेखेद्वारे खुद्द जी एच आपल्याला भेटत आहेत यात मला बिलकुल शंका वाटत नाही.

केवळ हीच कथा नव्हे तर अशा अनेक कथांमधून जीएंनी त्यांना जीवनात आलेले अनुभवच विलक्षण शब्दांत कथित केले आहेत.
माणसे: अरभाट आणि चिल्लर मध्येही जीएच आहेत.

जीएंच्या बहुतेक कथांमध्ये कथेची नायिका वाटावी अशी स्त्री ही नायकाशी अप्रामाणिक असल्याचे दिसते. इंजिनियर हा शब्द आला की जीए एखादे टोकदार तिरस्काराचे वाक्य टाकतातच. "इंजिनीयर म्हणजे जास्त पैसे मिळवणारा गवंडी" असे त्यांचे एक वाक्य कुठेसे वाचले आहे.