रुख़वत हा फ़ारा वर्षांपासून चालत आलेला प्रकार आहे.
पूर्वी ख़ेडेगावं होती...म्हणजे ती तशी अजूनही आहेतच...पण पूर्वीच्या काळी मुलगी एका गावातून दुसऱ्या गावात दिली जायची.
प्रवासाची साधने सुद्धा आजच्या इतकी प्रगत नव्हती. प्रवासात लूटमार होत असे.
त्यामुळे ख़ाण्यासाठी दीर्घकाळ टिकू शकतील असेच पदार्थ रुख़वतांत असत.
पूर्वीच्या रुख़वतांत अनेक पदार्थ असायचे. उदा:-लाडू, करंज्या वगैरे.
आजच्या बदलत्या काळात देख़िल काही गोष्टी तशाच आहेत. फ़क्त कालानुरूप त्यांत बदल झाले आहेत.
माझ्यामते तरी लग्न हा एक संस्कारांचा भाग आहे. दोन परिवार यामुळे एकत्र येतात, जोडले जातात. प्रेम विवाह (हा इथे चर्चेचा विषय नाही.)सुद्धा घरची मंडळी सामंजस्याने लावून देतात.
जर इतर लोकं आपल्यासाठी इतकं करतांत तर आपण का उगीच पुरोगामी असल्याचा आव आणायचा?
एखादी मुलगी २०-२५ वर्षे एखाद्या घरात राहून (शक्यतो) कायम साठी दुसऱ्या घरी जाते तेव्हा माहेरचे व तिथल्या लोकांशी तसेच त्याही लोकांचे तिच्याशी काहीच ऋणानुबंध नसतात का?
जर असतात तर त्या लोकांनी आठवण म्हणून काही दिले तर त्याचा इतका बाउ का करावा?
कदाचित माझे विचार मांडताना अघळ-पघळ झाले असतील.
कृपया सहकार्य करावे हीच विनंती.