भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ' आकाशवाणी' च्या मुंबई केंद्राने १९४७ ते १९९७ या पन्नास वर्षातील  'सर्वोत्कृष्ट दहा' पुस्तके निवडायचे आवाहन श्रोत्यांना केले होते. आकाशवाणीवरून सातत्याने निवेदन देऊन, नियतकालिकांतून निवेदन प्रसिद्ध करून, वाचकांच्या शिफारशी मागवल्या होत्या . त्यात निवडली गेलेली पुस्तके.

( काहींना समान गुण मिळाल्याने एकाच क्रमांकावर दोन-तीन पुस्तकेही आली.त्यामुळे यादीत अठरा पुस्तके आहेत.)

  1. ययाति / वि‌. स. खांडेकर
  2. कोसला / भालचंद्र नेमाडे
  3. बलुतं / दया पवार
  4. स्वामी / रणजित देसाई
  5. नट सम्राट / वि. वा. शिरवाडकर
  6. ऋतुचक्र / दुर्गा भागवत
  7. मृत्युंजय / शिवाजी सावंत
  8. काजळमाया / जी. ए. कुलकर्णी
  9. रथचक्र / श्री. ना. पेंडसे
  10. युगान्त / इरावती कर्वे
  11. व्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे
  12. बटाट्याची चाळ / पु. ल. देशपांडे
  13. मर्ढेकरांची कविता / बा. सी. मर्ढेकर
  14. पानिपत / विश्वास पाटील
  15. दुर्दम्य / गंगाधर गाडगीळ
  16. बहिणाबाईची कविता / बहिणाबाई चौधरी
  17. माणदेशी माणसं / व्यंकटेश माडगूळकर
  18. सनद / नारायण सुर्वे
संदर्भ आणि आभार: अंतर्नाद दिवाळी २००६