आपली उत्तरे १००% पटली.
आता मी विज्ञानाला ओढून का आणले याचा खुलासा: माझा अनुभवही आहे आणि निरिक्षणही (भारतीयांपुरते): आपण विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे उपासक विद्यार्थी वगैरे सर्व असतो, पण ते सोयीच्या. विकासाच्या नावाखाली जेंव्हा प्रदुषण होते तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष! तेव्हा असे वाटते की आपल्याला त्याचे परीणाम भोगावे लागणार नाहीत. ही अंधश्रद्धाच नव्हे का?
दोनएक वर्षांपुर्वी म.टा मधे डॉ. वसंत गोवारीकरांचा एक लेख आला होता. नारळीकरांप्रमाणेच मला त्यांच्याबद्दलही आदर आहे आणि तो पर्यंत विश्वास होता. पण या लेखात त्यांच्यासारखा विद्वान (आणि क्लायमेटॉलॉजिस्ट) म्हणाला की "वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग" वगैरे सर्व थोतांड आहे. भारताला त्याची काळजी करायची गरज नाही. मला धक्का बसला. (मजा म्हणजे त्याच वेळेस भारत सरकारची पर्यावरण वेबसाईट हिमालयातील हिमनगांच्या वितळण्यामुळे, आधी महापूर आणि नंतर दुष्काळ कसे अनुभवणार आहे ते सांगत होती. नंतर सरकार बदलानंतर ती माहीती गुप्त झाली!) मी म.टा. ला उत्तर लिहीले पण त्याला कचऱ्याची टोपली दिसली. कारण कदाचीत गोवारीकर कसे चूक? - हि पण बुवाबाजीच की!
सातारी माणसाच्या (मी नाव विसरलो पण मनोगतवरच आले होते), सौर शीतकपाटाला राष्ट्रपतींनी प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा वगैरे सारख्या स्वतःच्या नसलेल्या विषयात बोलण्या ऐवजी माशेलकर नारळीकरांनी (दोघांबद्दल मला खूप आदर आहे आणि आवडतात) जर विकत घेऊन जर लोकशिक्षण केले तर बरे नाही का? नाहीतरी ते अंधश्रद्धेबद्दल आणी दुधपित्या गणपतीच्या दहा वर्षांपुर्वीच्या गोष्टि उगाळून काय साधताहेत?
म्हणून माझ्या सारख्या "अंधश्रद्धाळू" माणसाला परत गीताच आठवते:
"जे जे आचरितो श्रेष्ठ, ते ते ची दुसरे जन, तो मान्य करतो, ते ते, लोक चालवतात ते॥"
नारळीकर माशेलकरांसारख्या श्रेष्ठ माणसांनी त्याचे क्षेत्र नसलेल्याभागात नुसते बोटे मोडण्याचा घाट घातला. आपण ना नारळीकर, ना माशेलकर पण त्यांचे बोटे मोड्णे मात्र सहज घेऊन आपल्याच लोकांना शिव्या देत बसलोय!