कोणि नुसत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही बोलल की हिंसाचार,जाळपोळ होते. ह्यां पैकी किती जण बाबासाहेबांचे विचार मानतात हा एक चर्चेचा प्रश्न आहे. जेव्हा एखादी संस्था पुतळा उभारते तेव्हा त्या पुतळ्याची सर्वस्वी जबाबदारी त्या संस्थेची असली पाहीजे. अशा घटनेत समाजकंटक दोषी आहेतच त्याचबरोबर त्या संस्थेला तसेच  पुतळा उभारणाऱ्यांना दोषी धरले पाहीजे. घटना झाली उत्तरप्रदेशातील कानपुरात आणि काही तासातच घटना महाराष्ट्रात पसरली तेवढ्या वेगात खैरलांजी प्रकरण पसरले नाही काय म्हणायचे.

झालेलि घटना निषेधार्ह असली तरी ह्यांपैकी किती जणांनी बाबासाहेबांचे विचार पोहोचविण्याचे काम केले.विचार महत्त्वाचा की पुतळा महत्त्वाचा. ?

घरात देव पुजायचे घराबाहेर जयभिम बोलायचे- इथे बाबासाहेबांनी घेतलेल्या पहील्याच प्रतिज्ञेचा विसर.

आपला

कॉ.विकि