आजचे कांदिवली हायवेवर केलेले जाळपोळीचे कृत्य विचारपूर्वक व सुसंघटीत होते. बायका-मुलांना निदर्शनांसाठी पुढे करून मागून जमाव दगड फेक करीत होता. म्हणून कामे अर्धवट सोडून घरी परतावे लागले.
डेक्कन जाळल्याची बातमी नंतर पाहिली. इतर ठिकाणीही निदर्शनांबरोबर जाळपोळ व सर्वसामान्यांच्या मलमत्तेचे नुकसान झाल्याचे ऐकले आहे.
सतत महाराष्ट्र पेटता ठेवण्या मागे कारस्थान असल्याचे वाटते. दुर्दैवाने मराठी बहुजन समाज त्याला बळी पडत आहे असे वाटते.