काय करणार? हे चालूच राहणार, जो पर्यंत सामान्य माणसाला हे नकोसे होऊन योग्य राजकीय नेतृत्व निवडायची अक्कल येत नाही. हे तर निव्वळ राजकारण आहे.

  1. लोकसत्ता मधल्या या बातमीकडे  कोणी लक्ष देऊ नये म्हणून?
  2. की महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जी अलीकडे दिसते आहे त्याला आंतरराष्ट्रीय पातळीला खीळ बसावी म्हणून?
  3. की शेतकऱ्यांचे मुद्दे दुर्लक्षीत व्हावे म्हणून?
  4. क्रिकेटची धुरा वाहताना इतर मुद्दे वर येऊन मिळणारी प्रसिद्धी, पैसा कमी होऊ नये म्हणून?
  5. की काकाच्या काठी ने मामा चा साप मारून स्वतःचा पक्ष महाराष्ट्रात जास्त ताकतवान व्हावा म्हणून? म्हणजे स्वप्नातली खुर्ची जवळ येईल?
  6. असेच स्वप्न पाहणाऱ्याचे स्वप्न (डेक्कनच मिळाली होती का जाळायला?) 
  7. या वर बोंब मारायला आहेतच मग इतर राजकीय पक्ष आणि त्यांना धर्मांध म्हणणारे इतर छुपे जातीयवादी (छुप्या रितीने जातीयवादाला खत पाणी घालणारे) आहेतच.
  8. राष्ट्रीय नेते म्हणतीलच, तुम्ही आम्हाला मते द्या. आम्ही तुम्हांस 'सोनियाचे' दिवस दाखवू.

मग कसली महासत्ता आणि कसली प्रगती? इथेच तर ओशाळली प्रगती.