सतत महाराष्ट्र पेटता ठेवण्या मागे कारस्थान असल्याचे वाटते. दुर्दैवाने मराठी बहुजन समाज त्याला बळी पडत आहे असे वाटते. >>
माधव, मलाही असेच वाटते.
दलित बांधवांचा वापर कोण करून घेत आहेत ह्याचा शोध त्यांनी आणि आपणही घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.
मी परदेशस्थ मनोगतींना आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रात दलितांच्या प्रक्षोभाने कालची कांडे घडलेली नाहीत. दलितांच्या मानसिकतेचा कुणीतरी गैरफायदा घेतांना जाणवते आहे. दलितांनी निस्संदिग्धपणे त्यांच्याशी आपला जराही संबंध नाही असे जाहीर करण्याची आवश्यकता असतांना दलितनेते म्हणवणारे लोक गुळमुळीत धोरण स्वीकारतांना दिसत आहेत. असे झाले तर 'इंद्राय तक्षकाय स्वाहा' ह्या उक्तीप्रमाणे त्यांनाही ह्या कांडास जबाबदार धरावे लागेल.