वा दिगम्मा अगदी योग्य ते बोललात!
श्रद्धेवर श्रद्धा! हा शब्दप्रयोग मलाही वापरावासा वाटतो नेहमी.
श्रद्धा बरेच वेळा माणसाला आवश्यक ते बळ देते, catalist म्हणून काम करते. श्रद्धा माणसाला उद्दाम होण्यापासून रोखूही शकते.
केवळ श्रद्धा असल्यामुळे अंगी चांगले गुण बाळगणारे अनेकजण या समाजात दिसतील (उदा दुसर्याला 'देव' मानणे, आणि त्याच्याशी चांगले वागणे).
यातील अनेक सद्गुण अश्रद्ध लोकांनाही बाळगता येतील, पण ते दिर्घकाळ बाणवून ठेवणे कदाचित कठीण जाईल.

'तर्कः अप्रतिष्ठः' तर्क हा अत्यंत चंचल असतो, आज योग्य वाटणारी गोष्ट उद्या आपल्या तर्का मागील गृहितके बदलली, की अयोग्य वाटू शकते. आज मी शेजार्यांशी चांगले वागतो आहे, कारण तसे करण्यात भले दिसत आहे (किमान काही वाईट तरी दिसत नाही). एकमेकांना त्रास न देण्यात win-win या न्यायाने (न्याय म्हणजे पुन्हा तर्कच) भले आहे म्हणून आपण त्याच्याशी चांगले वागू. उद्या तो आपल्याला काहीच त्रास देऊ शकत नाही असे आपल्याला जाणवले, तर त्याच्याशी चांगले वागण्याचे कारणच नष्ट होऊन जाईल. जर सद्वर्तनावर श्रद्धा असेल, तर दुर्वर्तन घडण्याची शक्यता कमी होते. अन्यथा चांगले वागण्याचे (आणित्या साठी कदाचित तत्कालीन फायद्यावर पाणी सोडण्याचे) प्रयोजनच रहात नाही.

अर्थात, काही लाभाच्या आशेने सत्यनारायणाची पूजा बांधणे हे काही फार मोठे श्रद्धेचे लक्षण नव्हे. आत्मशांतीसाठी (जर ती त्यातून मिळत असेल तर) तसे करणे हे मात्र फारसे चुकही नाही

-मन्दार.