अतिश सुंदर लेखन . विचार करावयास लावणारे. पण आरक्षण फक्त दहा वर्षासाठी नोंदविलेले आहे असे बाबासाहेब म्हणाले होते का?

भारत देश ईंग्रजांच्या गुलामगिरीतुन १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य झाला.पण दलित समाज भारतीय सवर्णांच्या गुलामगिरीतुन मुक्त झाला होता का? २६ जानेवारी १९५०पासुन भारत स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र म्हणुन उदयास आला. तेव्हापासुन असे म्ह्टले जाते की दलित जाती घटना देशाला अर्पण केल्यावर स्वकियांच्या (सवर्णांच्या) गुलामगिरितुन मुक्त झाल्या. पण अजुनही दलित अत्याचाराच्या घटना घडत असतात. कुठे हजारो वर्षाची गुलामगिरी आणि कुठे ही ५६ वर्षे. आणि आरक्षणाची अंमलबजावणी घटना लागु झाल्यावर लगेचच केली गेली का? त्या साठी कित्येक वर्षे जावी लागली. आणि दलित समाज तेव्हा न्युनगंडाने पछाडलेला. आजही काही प्रमाणात न्युनगंडाने पछाडलेला आहे. एका दोघांचा उत्कर्ष पाहुन संपुर्ण समाजाचा विकास झाला असे मानने संपुर्ण चुकीचे आहे.

नीलकांत तुम्ही आरक्षणाच्या विरोधात आहे का ?

आपला

कॉ.विकि