भारताची लाज वाटायचे तसे काही कारण नाही. प्रत्येक देशात लाजिरवाण्या वाटाव्या अशा काही गोष्टी घडतातच, असतातच. आपण काय करू शकतो!
तुम्हाला काय वाटते? भारतीय संस्कृती जागतिक पर्यटकांच्या स्वागतासाठी
सज्ज आहे का? पर्यटकांनी भारतात येताना काळजी घ्यावी का? (जसे अंगभर कपडे
घालावेत?) की भारतीयांना पर्यटकांशी कसे वागावे याचे शिक्षण देणे आवश्यक
आहे? 'टीप' (की भीक?) संस्कृतीचे काय?
भारत अजून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज नाही असेच खेदपूर्वक म्हणावे लागते. पर्यटकांशी कसे वागावे हे लोकांना विशेषतः पर्यटन व्यवसायातल्या लोकांना कळावे म्हणून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. मध्यंतरी टीवीवर जाहिराती यायच्या. पण केवळ त्यामुळे प्रश्न सुटणारा नाही. शिकवणी वर्ग घेऊन सभ्यपणाही येत नाही आणि अक्कलही. तसे संस्कार लहानपणापासून व्हायला हवेत.
तसेच दोन्हीकडून प्रयत्न व्हायला हवेत. भारतासारख्या देशात कपडे कसे, कुठले घालावे; तिऱ्हाइतांशी कसे वागावे हे शिक्षण पाहुण्यांना मिळायला हवे. (अनेक देशांचे दूतावास तसे शिक्षण देत असावेत असे वाटते.) आणि पाहुण्यांशी कसे वागायचे ह्याची अक्कल आपल्याला यायला हवी.
चित्तरंजन