चित्त,

एकंदर ही चर्चा भावनिक होते आहे असे दिसते.

लाज ही बुद्धीवर नसुन भावनेवर आधारीत आहे असे मला वाटते. त्यामुळे चर्चेचा उगम हा भावनेमधुनच झाला आहे असे वाटते.

बुद्धीनेच विचार केला तर अगदी साध्या/जीवशास्त्रीय भाषेत, ज्या पुरूषांनी मार्टीनच्या बायकोकडे बघीतले त्यात काहीच गैर नाही, कारण हा केवळ एक  नर - मादी एवढ्या पुरताच प्रकार राहतो.

आणि निसर्गात,नराला मादीचे आणि मादीला नराचे आकर्षण हे वाटतेच ... नाही का? हा झाला बुद्धीवाद!

कानफाड वाजवले की भारताबद्दलचे प्रेम सिद्ध होते, अशी काही भाबड्या लोकांची निरागस समजूत  आहे. वाचून हसू आले.

कानफ़ाडाने भारताबद्दलचे प्रेम सिद्ध होत नाही हे जरी खरे असले तरी, भारताबद्दल (वरील चर्चेतून सगळा भारत देश ... असेच सुचित होत आहे म्हणुन) कसेही बोललेले चालत नाही ह्याची जाणीव नक्कीच होईल असे वाटते.

मला भारताची लाज वाटत नाही. पण कुणाला वाटलीच तर मला तो देशद्रोही वाटत नाही.

वैयक्तिक प्रश्न म्हणुन सोडुन देवु शकतो. परंतु इथे ही वैयक्तिक बाब राहीली नाही. ती सार्वजनीक झाली / मांडली गेली . तेव्हा बाकीच्यांनाही ते रूचेलच असे नाही.

शिवाय देशद्रोह का काय ते ऐकणाऱ्याच्या मानसिकतेवरही अवलंबून आहे.

मी स्वतःला  ह्या जगाचा नागरिक समजतो.

फ़ारच आयडीयल जग आहे तुमचे... पण एक सांगू का, असेच जर सगळे लोक असते तर मग प्रश्नच उरले नसते हो.

आणि आधिच्या प्रतिसादात सांगितले तसे, अँजेलिनाच्या शरीर रक्षकाने काय म्हटले भारतीयांविषयी ते आठवून बघा... तेव्हा कुठे होतात तुम्ही की तुमच्या जगात नागरीकत्व घ्यायला गेला होतात?

"मी भारतीय आहे.त्यामुळे भारताची बाजू चुकीची असली तरी राखायलाच हवी, हिंदू आहे त्यामुळे हिंदू धर्मातील वाईट गोष्टींचे लंगडे समर्थन करायला हवे," ही कूपमंडुक आणि पोरकट मानसिकता आहे.

हो बरोबर, पण घरातील गोष्टी घरात येवूनच सुधाराव्यात. जगासमोर हो हो आमची चड्डी फ़ाटकी आहे हे सांगायची गरजच काय? (इथे हे सगळे महाजलावर आहे तेव्हा जगासाठी ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहे असे वाटते.)

अगदी अमेरिकेत किंवा ग्वाटेमालात मार्टिनच्या बायकोशी असे वर्तन झाले असते तरी आधी एक पुरुष आणि माणूस म्हणून मला तेवढेच वाईट वाटले असते.
जे झाले ते छानंच ... आमच्याकडे असेच असते असे कोणीच नाही म्हटले. सगळ्यांनी या गोष्टी घडू नयेत असेच म्हटलेय.

परंतु विषय मांडणाऱ्याने सरळ देशाची लाज वाटते म्हणने जरा जास्तीच होते ...

 

सरतेशेवटी आम्हा भारतीयांना धड चर्चा करता येत नाही आणि धड वाद/युक्तिवाद करता नाही, एवढे मात्र वाटते. आमची बौद्धिक वाढ खुंटली आहे, असे वाटायला लागले आहे.

काही म्हणा... एवढी वाढ झाली बुद्धीची की आपल्याला आपल्याच देशाची लाज वाटते .

आमची गावाकडची माणसं चांगली कि हो अशा बुद्धीवाद्यांपेक्षा...

--सचिन