रोहिणी,
पाककृती छानच. मी नेहमीच्या तांदळाऐवजी इडली राईस(उकड्या तांदूळ) वापरते. प्रमाण असेच. भिजायला घालताना उडीद डाळीमधे १०-१२ मेथ्या घातल्यास चव छान येते. शिवाय इडल्याही छान मऊ होतात. इथे फारशी उष्णता नसल्याने इडलीचे पीठ आंबण्यास वेळ लागतो. ओट्यावर ठेवल्यास ८-१० तासात चांगले आंबत नाही तेव्हा ते स्वयंपाकघरातील फडताळात ठेवल्यास उब मिळून सकाळपर्यंत फसफसून येते. तरीही इडल्या मऊ झाल्या नाहीत तर त्यात थोडे इनो फ्रूटसॉल्ट टाकावे ( पेठकरांनी सुचविले होते मागे).
डोश्याचे पीठही असेच प्रमाण पण वाटण करताना त्यात मूठभर शिजलेला भात टाकल्यास डोसे छान होतात.
श्रावणी