दोन-चार दिवसांआधी पेपरात वाचले की विद्यमान अध्यक्ष डॉ. अरूण साधू यांनी असे म्हटले आहे की ते मराठीच्या हितासाठी बाळासाहेबांना साकडे घालणार म्हणून. काहींनी लगेचच जीभा चावल्या. त्यानंतर लगेचच हा लेख वाचायला मिळाला. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा धोका वगैरे. हा सगळा केवळ योगायोग असावा का?
(थोडी गंमत, कृपया हलकेच घ्यावे: खरेतर लोकसत्तेत काहीतरी वाचायला मिळेल अशी आशा होती, पण मटात मिळाले. केतकरांनी असाच लेख लिहिला असता तर पहिल्या परिच्छेदात नेहेरू, नंतर इंदीरा गांधी नंतर अडवाणी, एक-दोनदा हिंदू अतिरेकी अशी जरा तिखट-मिठाची फोडणी दिली असती, आणि लेख जरा झणझणीत केला असता. तर असो.)