अत्त्यानंद, अनिरूद्ध, टग्या, लिखाळ आणि प्रियाली,

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक आभार!

अत्यानंदजी,

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची आठवण झाली हे वाचून मला खरं तर अंमळ संकोच वाटला. श्रीपाद कृष्ण फारच मोठे होते आणि आज कुणीही हौशी लेखकू त्यांचे केवळ अनुकरण करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यांचे कुठलेही साहित्य वाचलेले नसल्याने मला हा योगायोग फारच चकित करणारा वाटला. आपली प्रतिक्रिया वाचून लेखनाचा उत्साह दुणावला हे सांगणे नलगे.

अनिरुद्ध,

एकच साबणगाथा २-३ लेखक लिहित असल्याची कल्पना नव्हती. बहुधा, त्यामुळेच साबणगाथांचा प्रकार 'सात सुगरणी आणि भाजी अळणी'असा होत असावा.

टग्या,

शेक्सपियरच्या वाङ्मयाबद्दलचा शेरा जोरदार होता. आता शेक्सपियर वाचावाच म्हणतो. 'माकडाचा माणूस झाला तेव्हा खरी गडबडीला सुरुवात झाली' हा खूप रसभरीत चर्चेचा विषय होऊ शकतो.

प्रियाली,

त्या सुपीक शेतातील धन-धान्य खाऊन पोसलेली पिढी साबणगाथेला अजून कोणत्या प्रतलात नेईल त्याची कल्पना करवत नाही, :)

स्नेहांकित,

शैलेश