'आमच्या' कम्युनिटीत स्वागत आहे.... मजा येते आहे वाचताना,

आता बघू कोण काय म्हणते ते....

सचिन म्हेत्रे:  "रम्य ते दिन..." असेच बिचारे सगळे लग्न झालेले म्हणत असणार...
रावसाहेब विचार करा, अजून वेळ गेलेली नाही.... "गेले ते दिन गेले" असली गाणी नंतर म्हणत बसण्यापेक्षा "अभी तो मैं जवान हुं" असे म्हणणे सोपे !

भाऊ:  १/२-१ तासात कसे काय बुवा ठरवायचे की पुढे जायचे किंवा कसे?
अहो, १२ वर्षांत जे गुपीत अजून मला कळलेले नाही (स्त्रीस्वभावाचे) ते आपणांस इतक्या लवकर कसे कळेल ?

भास्कर(भिष्माचार्य)- मला हे सगळे करण्याची संधी मिळाली नाही, ते सोडा. पण पुष्कळ मित्रांच्या केसेस यशस्वी करून दिल्या आहेत. निःशंकपणे शंका विचाराव्यात. ;-)
बरे झाले तुम्ही आमच्या सौ. ना लग्नापुर्वी भेटला नाहीत नाहीतर तीने माझ्याशी कधीच लग्न केले नसते !

श्री. भोमे -
१-मुलगी पाहणे/दाखवणे या संकल्पनेला/प्रकाराला माझा कडक विरोध आहे.
माझाही... पण नाईलाज को इलाज क्या ?
२-किमान ४-५ प्रदीर्घ भेटी घेणे शहाणपणाचे ठरावे असे वाटते.
मुलगी तयार होईल ? मला नाही वाटत.....
३- आपण आहोत तसे सादर करावे. वागणे-बोलणे-कपडे-आवडी-निवडी यांत मुद्दाम वेगळेपण आणायचा प्रयत्न करू नये. (बी युअरसेल्फ!) हा व ह्या पुढे लिहीलेले सर्वच मुद्दे.......
निर्विवाद सत्य.... १०१% टक्के सहमत !

सुमित रेखी: आता मी जोडीदार होऊ शकेल अशा मुलीच्या शोधात आहे....!!!
शुभेच्छा !

वे. जो. - आपले लांबलचक अनुभव सावकाश वाचू !

आता जरा आम्हीही प्रकाश पाडू इच्छीतो.... सुटलेले काही मुद्दे असे आहेत.
१-  मुलीकडून नकार आल्यास परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. मुलींना मुले नकारण्याचा पूर्ण अधिकार असतो हे लक्षात घेऊन स्वतःची मानसिकता बनवावी.
२-  नातेवाईक / आई-वडील, मित्रमंडळी इत्यादींच्या दबावाखाली होकार देऊ/घेऊ नये.
३- शक्यतो सध्याच्या पद्धतीने महाजालावर गप्पा मारून आपले विचार बनवावेत हे शक्य नसल्यास ओळखीच्या व्यक्तींकडून माहिती मिळवून घेणे.
४- विवाह जुळवून देणाऱ्या सर्वच संस्था प्रामाणीक आहेत ह्या संभ्रमात राहू नये. फसवेगीरी प्रत्येक क्षेत्रात असते. सुरूवातीचा संदर्भ संस्थांकडून मिळवून पुढील गोष्टी स्वतः माहिती मिळवून घ्याव्यात.
५- वाडःनिश्चय व विवाहात पुरेसे अंतर ठेवावे जेणेकरून कुठेही मुलीला किंवा मुलाला विचार/जोडीदार पटत नसल्यास दुसरा पर्याय उपलब्ध राहिल व जीवनभराच्या दु:खातून सुटका होईल.

चांगला जोडीदार व मित्र मिळण्याला भाग्य कारणीभूत नसून आपले कर्तुत्व जबाबदार असते असे मला वाटते.

सर्वच विवाहोत्सुक तरुण तरुणींना शुभेच्छा !