सुनील,स्वतः या अनुभवातून गेले असल्यामुळे प्रामणिक मत देते आहे.भास्कर आणि भोमेकाका यांनी सुचवलेल्या मुद्द्यांचे परिस्थितीनुसार सुयोग्य मिश्रण करून, तुमचा प्रश्न सुटायला काही प्रमाणात का होईना नक्कीच मदत होईल. सुमित यांनी आचरलेली पद्धत सगळ्यानाच अमलात आणायला मिळाली तर सोन्याहून पिवळे!
पारंपारिक 'चहापोहे' कार्यक्रमात मनावर येणारे दडपण,एकाच भेटीत निर्णय घ्यावा लागणे या गोष्टी आपण हळूहळू डोळसपणे बदलल्याच पाहिजेत.असे म्हणतात की charity begins at home 'बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून होते'! या अश्या बदलांनी खूप मोकळे वाटते हे मी निश्चितपणे सांगू शकते.आणि मोकळ्या मनाने निर्णय घेणे सोपे होते......