हिरकणी सिंहगडावरची नसून रायगडावरची आहे हो.

तशा ठीकठिकाणी पाट्यापण लावल्या आहेत, पण त्या जास्त व्यस्थित पाहिजेत.  पण हे कोणाचे काम आहे?  पुरातत्व विभाग चालविणारे लोक आपलेच.  सरकारहि आपणच निवडून देतो.  तेव्हा ही जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे.

पर्यटकांना शिवाजी, तानाजी माहिती नव्हते तर लेखकाने त्यांना नीट समजाऊन सांगितले का?

कृति करावी नुसते ताशेरे झाडू नये.

मी जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा महाराष्ट्रात, (पुणे, मुंबई, नाशिक ) इथे आवर्जून मराठीच बोलतो.  दुकानदार, विक्रेते, वाहन चालक, अधिकारी, मित्र, नातेवाईक अशा सर्वांशी जास्तीत जास्त मराठी शब्द असलेलेच मराठी बोलतो.

प्रत्येक मराठी व्यक्तीने हे धोरण सतत बाळगले की आपोआप मराठीचा प्रभाव पडू लागेल.

कलोअ,
सुभाष