वरील लेखातील विचार माझे नाहीत. काल एकाने मला तो अंक दिला. माझ्या मनात विचार आला की असे लेख फक्त मर्यादित लोकांपुढेच न जाता मनोगत सारख्या विचारमंचावर आले तर विचारांना चालना मिळून वैचारिक देवाणघेवाण होऊन अधिक समाजोपयोगी विचार समोर येतील.

आपल्या प्रतिसादाने तो हेतू सफल झाल्यासारखे वाटले.

वरील लेखात लेखकाने म्हटले आहे की,

पाकिस्तानमधील या कुटुंबावर केंब्रीज, इंग्लंड येथील प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आले. या व्यक्तींमध्ये दु:खाचा अभाव का आहे हे  ही त्यांनी शोधून काढले आणि एकदा ही माहिती मिळाल्यावर त्यांचा प्रयत्न आता दु:खावर नवीन औषध शोधण्याचा चालू आहे. या सर्वच घटनेपासून आपण बोध घेणे आवश्यक आहे.

वरील वाक्यातून भारतीयांची विचारसरणी आणि पाश्चिमात्यांची विचारसरणी अधोरेखीत केली आहे.

आपण अघटीत घटनांकडे एक तर चमत्कार म्हणून तरी पाहतो किंवा थोतांड म्हणून त्यांना नाकारतो. त्यामागील कार्यकारण भाव काय असावा ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही.

प्रियाली,
आपण विचारलेले प्रश्न मलाही भेडसावत होते. "साधा" ह्या विशेषणातून लेखकाला तो माणूस सुशिक्षित, विचारवंत किंवा कोणत्याही कारणाने प्रसिद्ध नसावा असे सुचवायचे असेल.
त्यांनी जे प्रयोग केले त्यांचे अधिष्ठान काय होते हे मी त्यांना विचारणारच आहे. त्यांचे त्यासंबधीचे ते पुस्तक मी वाचले नाही.

मिलिंद,

ह्या भेडसावणाऱ्या प्रश्नांची निरीक्षणाशी जुळणारी उत्तरे आजवर विज्ञानाने दिलेली आहेत, आणि ह्यापुढेही विज्ञानातूनच मिळतील. त्यामुळे भानुदास सारख्या लोकांना वैज्ञानिकांच्या ताब्यात देण्यात यावे.

विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टींचे प्रांत भिन्न आहेत असे मला वाटते. भानुदासच्या ह्या शारीरिक बदलांचा अभ्यास व्हावा, संशोधन व्हावे असे लेखकाचे मत असावे. त्यांनी कोणत्या पद्धतीने आपले निष्कर्ष काढले हे मला माहित नाही. पण केवळ थोतांड म्हणत त्याला नाकारणे हेही त्यांना मान्य नसावे असे वाटते.

माझे प्रामाणिक मत असे की विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्ही प्रात भिन्न आहेत. मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी दोन्हींची उत्तम सांगड घालता आली तर आपण अधिक सुखी होऊ.

मी जेव्हा माझा भ्रमणध्वनी वापरायला सुरूवात केली तेव्हा माझ्या मनात विचार आले की जर वातावरणातील अनेक ध्वनीलहरींपैकी विशिष्टच ध्वनीलहरी मला माझ्या भ्रमणध्वनीसंचातून ऐकता येतात. त्याचवेळी माझ्या शेजारच्याच्या भ्रमणध्वणीसंचातून त्याला हव्या त्याच ध्वनीलहरी त्याला ऐकता येतात. जर आपले विचार हे सुद्धा काही विशिष्ट माध्यमातून प्रक्षेपित होतात तर ते आपल्याला का नाही पकडता येत? गजाननविजय ह्या पोथीत श्री‍गजानन महाराजांनी असे विचार ओळखून उपदेश केल्याचे वाचले आहे.

विचार हेही पंचमहाभूतांचेच प्रकटीकरण आहे असे म्हटले जाते. मी काही ध्वनीलहरींवर संशोधन करणाऱ्यांना विचारले होते की आपल्याला असे काही साधन बनवता येईल का जेणेकरून वातावरणातील नेमके विचार आपण स्विकारू शकू? त्यांनी मला सांगितले की सध्यातऱी ते शक्य नाही. म्हणजे भविष्यात होऊ शकेल का?

सध्यातरी मानवाचे ज्ञान परिपूर्ण नाही ह्याची मला खात्री पटली आहे. अधिक परिपूर्णतेकडे गेला की अध्यात्म साकारेल अशी माझी धारणा आहे.

हे सारे विचार मी छापील प्रत घेऊन त्या गृहस्थांकडे पाठवू इच्छीतो. जेणेकरून त्यांनाही मनोगतची ओळख होईल आणि आपल्या प्रश्नांना अधिक चालना मिळेल.

धन्यवाद.