नीरजा,
अनुभव आणि त्याकडे पहाण्याची वेगळी दृष्टी आवडली. अनुभव महत्त्वाचा, तो व्यक्त करता येणे महत्त्वाचे हे एकदम पटले.

"शीर्षक.. दिलेच पाहिजे का? मला आवडत नाही कवितेला शीर्षक द्यायला तेव्हा ही कविता शीर्षकाविनाच राहू द्या."

आवडीचे स्वातंत्र्य तुझेच, पण कवितेची कॅटॅगरी आधीच ठरली आहे, त्यासाठी नियम आहेत.गझल आहे, मुक्तछंद आहे मुक्तक आहे, लिहिणाऱ्याने लिहित जावे त्याचा विचार करू नये एवढे खरे.

पण कवितेला शीर्षक नको अशा आवडीचे हजार लोक तयार झाले की किती मजा येईल नाही? माझ्या अनुभवानुसार एखादी वृत्ती सर्वत्र पसरायला वेळ लागत नाही. तेव्हा उद्या शीर्षक- छ्या, कवितेला नाव नको, नाटकाला नाव नको, माणसाला तरी नाव कशाला हवे? असे प्रश्न मनात आले तर गंमत होईल नाही.