अनुभव आणि त्याकडे पहाण्याची वेगळी दृष्टी आवडली. अनुभव महत्त्वाचा, तो व्यक्त करता येणे महत्त्वाचे हे एकदम पटले.
धन्यवाद. नुसतं व्यक्त करता येणं म्हणत नाहीये. व्यक्त केलेलं जे काय असेल ते आस्वादकाने अनुभवणे महत्त्वाचे असे मला म्हणायचेय. कॅटेगरी पेक्षा.. त्या अनुभवाला सरेंडर होणे.. आस्वादकाने.. हे महत्त्वाचे.. आणि अतिशय अवघड असते.
पण कवितेची कॅटॅगरी आधीच ठरली आहे, त्यासाठी नियम आहेत.
कुठली? आधी लेखन, नंतर नियम असा प्रवास होतो ना साहित्याचा? असो..
पण कवितेला शीर्षक नको अशा आवडीचे हजार लोक तयार झाले की किती मजा येईल नाही?
तुमच्या या सर्वच परिच्छेदाचा सूर उपरोधिक आणि अर्थ मी काही चुकीचे नवीन वळण देऊ पहाते आहे असा जाणवतोय. कारण कळले नाही. पण कविता आणि माणसांची ऍनॉलॉजी अज्जिबातच पटण्यासारखी नाही. आणि कवितेला शीर्षक देण्याची जबरदस्ती मला मान्य नाही. मला गरज वाटली तर माझ्या कवितेला मीच नाव देईन, कवितेत एक शब्द जास्त वेळा आला आहे या निकषावर दुसऱ्या कोणी माझ्या कवितेला नाव द्यावे हे मान्य नाही.