चला, पिवळेपणा संपला ते बरेच म्हणायचे. पण लेखांचा प्रवास संपला याचे वाईट वाटत आहे. ग़ेल्या काही दिवसांपासून तुझी ही लेखमाला वाचण्यात मजा आली. पण विनोदाबरोबरच काही मनाला लागणाऱ्या गोष्टीही होत्या तुझ्या लिखाणात, त्याही भावल्या. जसे,
''माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. कोणीतरी जवळचा नातेवाईक अनेक दिवसांपासून आजारी..गावात सोयी नाहीत. कुठूनतरी कसातरी पैसा जमवून लगेच शहरात येऊन त्याला जनरल वॉर्डात ऍडमिट केलं..आणि या महागड्या शहरात रात्रीपुरता निवारा परवडणार कसा? म्हणून बाहेरच पॅसेजमध्ये झोपायचं..उद्याच्या दिसाची आणि औषधांच्या खर्चाची चिंता करत..
'बाबा घरी जाऊन आई ड्यूटीवर आली. मला 'आज दमले आहे. आज नाही येत माहेरी.' असं सांगून घरी लोळत आणि गोष्टीची पुस्तकं वाचत घालवलेले अनेक शनिवार आठवले आणि स्वत:ची लाज वाटली.'
एकूण शेवटही गोड झालेला आहे. पेरूवाल्याचा किस्सा आवडला. असेच लिखाण पुढे वाचायला मिळो ही सदिच्छा.
-अनामिका.