अधिकाधिक वाचकांनी आपले लेखन वाचावे, यासाठी लेखाला असे झणझणीत शीर्षक देण्याची युक्ती आता नवीन राहिलेली नाही. तसेच अशी धोक्याची सूचना सुरुवातीलाच आणि ती सुद्धा ठळक लाल रंगात लिहिली, की लेखन वादग्रस्त होते व जास्तीत जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते
हेच!!! म्हणून काहीतरी उफराटे शीर्षक शोधले. लेख छान आहे वाचून मस्त करमणूक झाली, परंतु या लेखाचे स्वानुभव असे वर्गीकरण करू नये असे म्हणणे मात्र पटत नाही, तसे केल्याने तू अर्ध्याअधिक प्रतिसादींना कटवतो आहेस. (अर्थात ते कटतात का हा भाग वेगळा.) इतक्या "नाजूक विषयाला" हात घातल्यावर आपल्या मनातील मनोगत सांगायचे नाही की काय?
आता समज की,
आता जगातील समस्त बायकांची क्षमा मागून, तुझ्या मामेबहिणीची (आणि माझ्या एकुलत्याएका नवऱ्याच्या एकुलत्या एका बायकोची [म्हणजे स्वतःचीच] )क्षमा मागून --
बायको कशीही मिळो, तुझ्या मामेबहिणीसारखी किंवा माधुरी दिक्षितसारखी, लग्नानंतर "कमाल" सात वर्षांनी (म्हणजे ते सेवन इयर इच वगैरे) तुझ्या हमखास लक्षात येईल की राक्षस आपल्या स्वजातीयांनाच पळवून नेत असतो. (माणसांना पळवून नेत असता तर खाऊन टाकलं नसतं का?) आणि हे जेव्हा तुला पटेल तेव्हा एखाद्या राजपुत्रासारखा त्या बायकोला सोडवून आणण्याऐवजी काकुळतीने तू राक्षसाला म्हणशील,"घेऊन जा रे बाबा हिला आणि उपकार कर माझ्यावर की परत आणून सोडू नकोस (तसे होण्याची शक्यता जास्त असली तरीही) तुला खंडणी हवी असेल वर तर तीही देतो."
लग्नाचा लाडू खाऊन पाहण्यासाठी शुभेच्छा. मधुमेह काय नंतर सगळ्यांना होणारच आहे.
सर्वांनी ह. घ्या. पुन्हा एकदा, लेख आवडला.