चष्मेबद्दूरचे रसग्रहण तर बहारीचे होतेच आणि आता या दोनही चित्रपटांची करून दिलेली ओळख मस्तच आहे. चष्मेबद्दूर पाहिला तेंव्हा आम्हीही तसेंच बॅचलर होतो आणि चित्रपट पाहून आपल्या खोलीच्या दारावरही अशीच एखादी मिस् चमको बार बार लगातार थाप मारो असं वाटायचं. दीप्ती नवलचा सहजसुंदर अभिनय फार भावला होता तेंव्हा.

अनुपम खेर बद्धलचे आपले मत मनापासून पटले. पण या माणसाची एक खासीयत म्हणजे हा कधी टाईपकास्ट झाला नाही आणि चरित्रनायकाने ए.के. हनगल प्रमाणे कायम अंडरप्ले करीत असले पाहिजे ही समजूतही मोडीत काढली. अनुपमच्या अभिनयात असीम नाटकीपणाही (ओव्हरप्ले) खूपदा आढळून आला. (उदा. तेजाब) पण जसा शक्तिकपूर नंतर नंतर कंटाळवाणा झाला तसा अनुपम कधी झाला नाही. अनुपममधील अभिनय क्षमता (पोटेन्शीयल) सारांश नंतर तितकी कोणाला वापरून घेता आली नाही असे म्हणावे लागेल.