१. उगाचच परप्रांतियांबद्दल(बाजू घेउन )लिहू नका.
२. दोन मराठी व्यक्ति भेटल्या तर बहुदा त्या इंग्रजी अथवा हिंदीतून संभाषण करतात. आणि हे विशेषत: पुण्या-मुंबईच्या मंडळीबाबत जास्त दिसून येते.
'आपल्या' माणसांना अगदी मनापासून विरोध करणे हीच तर आपली खासीयत ! [:)] अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून तपासून पाहा ..
बंगलोरला झाडून सगळे रेडिओ चॅनेल्स (RJ लोकं) कन्नड मधून बडबड बडबड करत असतात आणि कन्नड गाणीही हैराण करतात ...पुण्याला / मुंबईला हे कधी जमणार ? कुठपर्यंत हिंदीची (आणि 'त्यां'ची) गुलामगिरी चालणार ?