गरम गरम कांदाभजी, मधेच रुचिपालटाला एक मिरचीच भजं आणि बरोबर दही. खलास! या पलिकडे सुख म्हणजे ते काय?

हाय...! साक्षी, मार डाला........

आत्याला जाउन आज बराच काळ लोटलाय. भजी आधीही खाल्ली होती, आताही अनेकदा खातो, पण त्या कांदाभज्यांची आठवण आजही ताजी आहे. अशी भजी कधी झाली नव्हती आणि होणारही नाहीत.

आठवणींचा सुगंध मनात कायम दरवळत राहील.